मराठी
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्यासाठी तुम्हाला शेअर बाजाराच्या वेळा माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक असाल तर तुम्ही भारतीय शेअर बाजाराच्या वेळेची सर्वोत्तम आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी योग्य अशी जागा निवडली आहे.
भारतीय शेअर बाजारात काही ठरविक वेळेत व्यापार करता येऊ शकतो . तसेच सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना दलाल कंपनी मार्फत व्यवहार करणे बंधनकारक आहे. हे व्यवहार शेअर बाजार सकाळी ९.१५ वाजता उघडल्यावर करता येऊ शकतात. सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांमध्ये दुपारी ३.३0 वाजता शेअर बाजार बंद होतो. त्यामुळे त्या वेळेपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण केले गेले पाहिजेत.
राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) भारतातील मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. सर्वाधिक इच्छुक गुंतवणूकदार त्यांचा पैसा प्रामुख्याने अशा सिक्युरिटीजच्या खरेदी अथवा विक्रीसाठी वापरतात ज्यांची नोंद ह्या एक्सचेंज मध्ये आहे. या दोन्ही शेअर बाजारांच्या वेळा सारख्या आहेत.
भारतातील शेअर बाजाराच्या वेळा
भारतीय शेअर बाजार तीन मुख्य उपश्रेणींमध्ये विभागला गेला आहे. त्या उपश्रेणी खालील प्रमाणे आहेत:
शेअर बाजार उघडण्या आधीची वेळ
शेअर बाजार उघडण्या आधीचे सत्र सकाळी ९ वाजता सुरु होते आणि ते ९.१५ पर्यंत असते. कोणत्याही सिक्युरिटीजच्या खरेदी किंवा विक्रीच्या ऑर्डर्स ह्याच वेळात पूर्ण कराव्या लागतात. शेअर बाजार उघडण्या आधीचे सत्र तीन भागात विभागले गेले आहे.- सकाळी ९ ते ९.०८
- सकाळी ९.०८ ते ९.१२
- सकाळी ९.१२ ते ९.१५
सामान्य सत्र
सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० ही भारतीय शेअर बाजाराची प्राथमिक वेळ मानली जाते. ऑर्डर मॅचिंग प्रणाली नुसार या वेळात व्यवहार पूर्ण केले जातात. पुरवठा आणि मागणीच्या आधाराने किंमत निश्चित केली जाते. द्विपक्षीय ऑर्डर्स अस्थिर असू असतात आणि त्यामुळे चढउतारांची शक्यता असते. अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी मल्टी-ऑर्डर प्रणाली शेअर बाजार उघडण्या पुर्वीच्या सत्रात सुरू करण्यात आली आणि भारतीय शेअर बाजारात वापरण्यात आली.शेअर बाजार बंद झाल्यानंतरचे सत्र
भारतीय शेअर बाजार दुपारी ३.३० वाजता बंद होतो. ह्या सत्रानंतर शेअर बाजारात कोणतीही देवाणघेवाण होऊ शकत नाही ह्याची नोंद घ्यावी. परंतु शेअर बाजार बंद होतानाची किंमत ह्या वेळात निश्चित केली जाऊ शकते. ह्याचा फायदा दुसऱ्या दिवशी शेअर बाजार उघडताना सिक्युरिटीजची किंमत ठरवण्यासाठी होतो.भारतातील शेअर बाजार बंद होण्याची वेळ
भारतातील शेअर बाजार बंद होण्याची वेळ दोन भागांमध्ये विभागली जाऊ शकते. त्या वेळा खालील प्रमाणे आहेत:- दुपारी ३.३० ते ३.४०
- दुपारी ३.४० ते ४
| अनुक्रमांक | नाव | वेळ |
| १ | शेअर बाजार उघडण्या पूर्वीची वेळ | सकाळी ९ ते ९.१५ |
| २ | सामान्य सत्र | सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० |
| ३ | समापन सत्र | दुपारी ३.३० ते ४ |
Easy & quick
Leave A Comment?